Thursday, January 9, 2025

 Bohalyawar Janyacha Kharcha by Dr Adik B R , Dt ०२ June २०११

बोहल्यावर जाण्याचा खर्च

डाॅ  आदिक बी  आर 

०२ जून २०११

लग्ने स्वAगात ठरतात आणि पृथ्वीवर साजरी केली जातात  असे म्हणतात स्वAगात

ठरलेली गोष्ट पृथ्वीवर निश्चित करण्यासाठी आणि प्रत्यक्ष बोहल्यावर गाजदिव्यासाठी मात्र भरपूर खर्च करावा लागतो  विवाह संस्थेच्या प्रारंभापासून आजपर्यंत अनेक बदल होत गेले आहेत  इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्यही समूहात राहून आपल्या भौतिक व शारीरिक गरजा पूर्ण करत असे  भूतकाळाच्या उदरात कधी तरी एका पुरूषाने एका स्ति्रचा हात धरून स्वतंत्रपणे जगण्याचा विचार केला असेल तिथेच विवाह संस्था जन्मली, परंतु या गोष्टीला समाजमान्यता मिळविण्यासाठी बराच काळ गेला असेल  स्थिर आणि सुसंस्कृत  समाजव्यवस्था निAमाण करण्याच्या दृष्टीने विवाह आणि कुटूंबव्यवस्था प्राथमिक गोष्ट होती  लग्नाव्दारे एक पुरूष आणि स्त्रीला एकत्र राहण्याची, वंशवेल वाढवण्याची आणि संपत्ती हस्तांतरीत करण्याची समाजमान्यता मिळू लागली  कालांतराने या समाजमान्यतेला कायद्याचा आधार दिला गेला  एका पुरूषाने अनेक स्ति्रयांशी किंवा एका स्त्रीने अनेक पुरूषांशी लग्ने करण्याची उदाहरणे आहेत; परंतु ती कमीच आहेत 

                   पूAवी कन्यादान करण्यासाठी, खAचिक समारंभ करण्यासाठी पध्द्त नव्हती, परंतु अलीकडच्या काळात लग्न म्हणजे आपल्या सांपत्तीक स्थितीचा डामडौल प्रदAशित करण्याचा मार्ग झाला आहे  काही जण खर्च करू लागल्याने इतरांनाही प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च करावा लागत आहे  आपल्या देशात विवाह ही गोष्ट सार्वजनिक आहे  विवाहासाठी पंचांगानुसार विशिष्ट तिथी शुभ मानल्या जातात  यामुळे विशिष्ट तारखांना लाखो विवाह देशात होतात  एकाचवेळी होणाÅया लग्नांमुळे सर्व सुविधांसाठी एकत्रित मागणी होत असल्याने खर्च आणखी वाढतो  लोकसंख्येचा विचार करता विवाहासाठी वAषातील काही दिवस शुभ मानणे उचित वाटत नाही  जगातील इतर धAमीय लोक वेगवेगळया दिवशी लग्ने करत असतात  म्हणून त्यांच्या जीवनात काही अशुभ घडत नाही 

                   विवाह जमविण्याची आणि करण्याची पध्द्त काळाच्या ओघात बदलत आहे  पूAवी अगदी पाळण्यात किंवा बालवयात लग्ने लावली जात असत  यातील दोष कमी करण्यासाठी कायद्याने विवाहासाठीचे वय निश्चित करण्यात आले  पूAवी जवळच्या नात्यातच विवाह केले जात असत  आता नात्याच्या पलिकडे जाऊन वेगळया जातीतील, धAमातील व देशातील जोडीदार निवडले जातात  लग्न हा एक मोठा व्यवसाय होत आहे  २९ एप्रिलला ब्रिटनचा राजपुत्र विल्यम यांचा विवाह चि  सौ  का  केंट मिडलटन यांचेशी विवाह झाला  हा विवाह केवळ राजघराण्याचा वैयक्तिक मामला न राहता सबंध देशाचा सोहळा झाला  इलेक्ट्रानिक माध्यमांच्या जादूमुळे सबंध सर्व इcग्लbश लोक या विवाहात सामील झाले  या लग्नासाठी अफाट खर्च झाला असेलच, परंतु त्या विवाहानिमीत्त इतर लोकांचा एकूण खर्च किमान सहाशे कोटी पौंड झाला असण्याचा अंदाज  आहे 

          आपल्या देशातही दरवAषी चित्रपट सृष्टीतील, उद्योग जगातील अनेक श्रीमंतांची राजेशाही विवाह सोहळे होत असतात  या सोहळयामध्येही कोट्यावधी रूपये खर्च होत असतो  श्रीमंत लोक हौस म्हणून, प्रतिष्ठा वाढविण्यासाठी किंवा प्रसिध्द्ी मिळविण्यासाठी खAचिक विवाह सोहळे करतात  त्यांची नक्कल करण्यासाठी अनेक मध्यमवAगीय व गरिब लोक ऐपत नसतांना कर्ज काढून खAचिक लग्ने करतात  विवाह जुळविण्यापासून खAचाला सुरूवात होते  अजून प्रेमविवाह तुरळक असल्याने कुटुcबbयांनाच पाल्यांची लग्ने जुळवावी लागतात  हौसेने किंवा मोबदला घेऊन लग्ने जुळविणारे अनेक जण आहेत  तंत्रज्ञानात प्रगती झाल्याने अनेक डाॅट काॅम कंपन्या विवाह इच्छुक मुला मुलींची माहिती व फोटो आॅनलाईन उपलब्ध करून देत आहेत  या सेवेसाठी शुल्क आकारले जाते  लग्न जुळविण्यासाठी अनेक ठिकाणी प्रत्यक्षपणे जाण्यापेक्षा आॅनलाइन माहिती घेणे कमी खAचाचे आहे  लग्न जुळल्यानंतर अनेकजण साखरपुडयाचा घाट घालतात  यासाठी भरपूर खर्च होतो  प्रत्यक्ष लग्न समारंभासाठी वधू व वर पक्षांचा खर्च ऐपतीनुसार काही हजारांपासून कोटींपर्यंत असतो  लग्नपत्रिकांची छपाई व वाटप यासाठी भरपूर खर्च होतो  मंगल काAयालय किंवा मंडप ही मोठी खAचिक बाब असते  शिवाय लग्ने एकाच वेळी होत असल्याने काAयालयाची मंडपाची, मिरवणूक साधनांची बँड बँजो डीजे वाहतूक साधने या सर्व बाबींवरील खAचात किमान तीस ते चाळीस टक्के वाढ होत असते  जेवणावळच्या खAचातही मोठी वाढ होत असते  सोन्याच्या किमती देखील लग्नसराईत वाढलेलीच असते  कारण सोने खरेदी शिवाय कोणतेही लग्न होतच नाही 


लग्नसमारंभातील वधु वर पक्षांच्या प्रत्यक्ष खAचाबाबत बरीच चAचा होत असते  परंतु या समारंभाला येणाÅया भाऊबंद, नातेवाईक व मित्रपरिवाराच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खAचाबाबत फारसा विचार होत नाही  लग्नाला हजेरी लावणाÅया प्रत्येक व्यक्तीला खर्च करावाच लागतो  उन्हाळयातील चाळीस अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात फिरल्याने अनेक जण आजारी पडतात  काम बुडते खर्च होतो व नंतर आजारपणाचा भुर्दंड सहन करावा लागतो  लग्न सोहळा हा कौटुcबbक स्तरावर मAयादित ठेवुन वAषातील कोणत्याही दिवशी आनंदाने साजरा करण्याचे शहाणपण आपल्याला कधी येणार कोण जाणे 

No comments:

Post a Comment

1 असा आहे अहमदनगर जिल्हा!

 असा आहे अहमदनगर जिल्हा! डाॅ  बारहाते जी  एच दि  २६ जानेवारी २०११ भारतीय द्विपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्रामुख्याने...